पावसाळा अजून संपलेला नसल्याने अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने अशा ठिकाणांमधून डासांची व्युत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू आहे, पाऊस थांबल्यानंतर देखील पुढचे 15 दिवस हे महत्वाचे असून संपूर्ण ऑक्टोबरपर्यत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क रहाण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
इंदिरानगर आणि आजुबाजुचा पाणीपुरवठा आज बंद
इंदिरानगरकडे पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज (गुरूवार) पहाटे चार वाजता ज्ञानेश्वर नगर नाका येथे फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी इंदिरानगरकडे येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, डवले नगर, रूपा देवीपाडा, लोकमान्य नगर, किसन नगर, भटवाडी इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा आज (गुरूवारी) बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.