खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कोकण विभागात २५ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे विभागीय कृषि सह संचालक अंकुश माने यांनी सांगितले आहे.
krushidin
जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
जिल्ह्यातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देणारे उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी आणि उत्कृष्ट बचतगटाचा सत्कार
कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी आणि उत्कृष्ट बचतगटाचा सत्कार करण्यात आला.