कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी आणि उत्कृष्ट बचतगटाचा सत्कार करण्यात आला. बचत गटाच्या माध्यमातून छोट्या शेतक-यांचा विकास होऊ शकतो. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होऊ शकतात. बचत गटाच्या माध्यमातून सामुहिक शेती शक्य असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी सांगितलं. यावेळी भगवान घोरड, शिवाजी भंडारी, पुंडलिक वेखडे, विनायक पाटील, केशव देसले, देऊ हंबीर, तानाजी गावंडा, गंगाधर वाघ या शेतक-यांचा सत्कार करण्यात आला.