गावदेवी मैदान येथील तीन इमारती धोकादायक झाल्याने ठाणे महापालिकेकडून तोडण्यात आल्या. त्यामुळे सुमारे २७ वर्षे हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेल्या सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मालकी हक्काची घरे मिळाली.
BJP
छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्यं करणा-या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ शासकीय विश्रामगृहासमोर निषेध आंदोलन
छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्यं करणा-या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ शासकीय विश्रामगृहासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं.
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार आंदोलन
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आलं.
प्रशांत जाधव हल्ल्याचा तपास क्राईम ब्रॅंचकडे देण्याची भाजपाची मागणी
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यातील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याबाबत आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
ठाण्यात ९ ते १५ जानेवारी दरम्यान रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं आयोजन
ठाण्यात दरवर्षी प्रमाणे रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे.
‘एसआरए’तील झोपडपट्ट्यांच्या संतापाला अधिवेशनात वाट – मिनी क्लस्टर योजना आणण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी
आधीच एसआरए योजनेची प्रक्रिया सुरू झालेल्या झोपडपट्ट्यांना क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला असून त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. आमदार संजय केळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून रहिवाशांची बाजू ठामपणे मांडली.
राष्ट्रवादीने अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राजकीय संस्कृतीला काळीमा फासल्याचा निरंजन डावखरेंचा आरोप
भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करत होते. भ्रष्टाचाऱ्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, अशी कठोर टीका भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली.
अंतर्गत मेट्रो प्रकल्पातील इमारतींच्या पुनर्वसनासाठीचा निर्णय अधिवेशनानंतर १५ दिवसात घेणार – उदय सामंत
शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा जनतेच्या अपेक्षेनुसारच पूर्ण केला जाईल. अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसात बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.
पैसे घेऊन घरे देण्यास टाळाटाळ करणा-या विकासकांवर होणार कारवाई
सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन इमारतीची एकही वीट न रचता फसवणूक करणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जिल्ह्यातील ११ हजार शिक्षक-शिक्षकेतरांचे पगार वेळेवर होणार
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेतरांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी शासनाने अखेर ७१ कोटींची तरतूद केल्याने ११ हजार शिक्षकांचे पगार वेळेवर होणार असून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याच्या यश आले आहे.