महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाष जाधव यांना ९ एप्रिल पर्यंत मुंब्र्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कळव्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त विलास शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. सध्या रमजान महिना सुरु आहे. मुंब्रा हे अति संवेदनशिल शहर असुन अविनाष जाधव यांच्या व्यक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंब्या्तील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अविनाष जाधव यांना ९ एप्रिल पर्यंत ही प्रवेश बंदी करण्यात आली आहे.