सध्याच्या राजकारणात अश्यक्य असे काहीच नाही. ज्या शक्यता वर्तवल्या जातात त्यात सत्य असेल नसेल परंतु हे आमचे क्षेत्र नाही किंवा आम्हाला यात पडायच नाही. आम्हाला लोकांची कामे करायची आहेत. त्यांच्याबद्दल काही असेल तर आम्हला विचारा परंतु अश्या काही गोष्टी आहेत, त्या वारंवार सातत्याने वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये घडत आहेत. त्यामुळे इम्पॉसिबल काहीच नाही. असे विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. दिवा पूर्व रेल्वे तिकीट खिडकीसाठी आपण प्रयत्न केले पण याचं श्रेय ज्याला घ्यायचं असेल त्याला घेऊ दे असं सांगत राजू पाटील यांनी शिवसेना आणि नरेश म्हस्के यांना टोला लगावला. काम आम्ही केलेलं आहे. गेले आठ वर्षे ही कामे होत नव्हती. त्यांचा खासदार असूनही कामे होत नव्हती. मी आमदार म्हणून निवडून आल्या पासून तिकीट खिडकी दिवा पूर्वेला कशी होईल यासाठी प्रयत्न करत होतो. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होतात, तिकीट काढायला जाताना लोकांचे अपघात होतात. त्याला कुठे आळा बसला पाहिजे. लोकांना थोडी सुविधा मिळावी यासाठी मी दिवा पूर्वेला तिकीट खिडकी व्हावी ही मागणी केली होती. यासाठी केलेला पत्र व्यवहार आणि त्याची आलेली उत्तरं आपल्याकडे आहेत. त्यामुळे दिव्यातील लोकांना माहिती आहे, कोणी कामे केली आहेत. पण ज्यांना श्रेय घ्यायचं आहे त्यांना ते घेऊ द्या सत्तेत असताना काय केलं नाही, आता दिव्याचा सिंगापूर करू अशी वार्ता करतायत ही लोक, त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत असं राजू पाटील यांनी सांगितलं.