जम्मू-कश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या पुलवामा घटनेच्या खुलाश्यामुळे काँग्रेसनं संपूर्ण देशभरात “शर्म करो…मोदी शर्म करो असा नारा देत निदर्शने केली. ठाण्यामध्येही काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शर्म करो मोदी, शर्म करो असा नारा देत ही निदर्शने करण्यात आली. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपा सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे पंतप्रधानाचे अत्यंत विश्वासू असतानाही त्यांनी अत्यंत निडरपणे पुलवामा घटनेचा खुलासा केला. आतापर्यंत आपण एका वेगळ्याच पद्धतीने पुलवामा घटनेला बघत होतो परंतु मलिक यांच्या या विधानामुळे केंद्रातील भाजप सरकारची या घटनेत अक्षम्य चूक झाली असून या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सागितले? असा सवाल करीत भारतीय जवानांना दुसरीकडे पाठवण्यासाठी विमानाची मागणी का नाकारण्यात आली असा सवाल विक्रांत चव्हाण यांनी केली. आर एस एस चे संघटक महासचिव राम माधव यांनी सत्यपाल मलिक यांना ३00 कोटीची ऑफर का दिली? या प्रश्नाचे जनतेला उत्तर मिळाले पाहिजे. ना खाउंगा ना खाने दूंगा अशा वल्गना करणारे नरेंद्र मोदी यानी खुलासा करून जनतेला प्रश्नांची उत्तर दिली पाहिजेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.