ठाण्यातील नामफलकांची दुरावस्था दूर करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

शहरातील विविध नामफलकांच्या दुरावस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापालिकेचं लक्ष वेधलं असून लोकभावनांचा आदर राखत या नामफलकांचे सुशोभिकरण करावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रविंद्र मोरे यांनी महापौरांकडे केली आहे. वीर सावरकर मार्गावरील नामफलकाचे सुशोभिकरण केल्यानंतर शहरातील विविध भागातील नागरिकांकडून त्या त्या भागातील नामफलकांच्या दुरावस्थेबाबत अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा विषय सोडवण्यासाठी महापौरांची भेट घेऊन त्यांना निवेदन आणि नामफलकांच्या दुरावस्थेची छायाचित्रं दिली. महापौरांनीही यावर लवकरच कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading