एका २२ वर्षीय युवतीचा मोटरसायकलवरून पडून टेम्पोखाली आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. चिंचवलीच्या रहिवासी असलेल्या किर्ती जाधव यांचं अलिकडेच लग्न झालं होतं. त्या आपल्या पतीबरोबर नातेवाईकांना भेटण्यासाठी कल्याणला दुचाकीवरून जात होत्या. वाटेत किर्ती जाधव यांची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात अडकल्यामुळे त्या दुचाकीवरून पडल्या, त्याचवेळी मागून एक टेम्पो भरधाव वेगानं जात होता. या टेम्पोखाली त्या आल्यानं त्या चिरडल्या गेल्या आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला. सध्या भिवंडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.