ठाणे आणि दिव्या दरम्यान पाचव्या तसंच सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य

ठाणे आणि दिव्या दरम्यान पाचव्या तसंच सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तीन-साडेतीन वर्षात या प्रकल्पाला गती मिळाली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाण्यापुढील प्रवाशांना त्याचा जास्त फायदा होणार आहे. उपनगरीय गाडीच्या फे-या वाढल्यामुळं प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पामध्ये सातत्यानं मोठ्या अडचणी येत होत्या. या अनेक अडचणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून ख-या अर्थानं या प्रकल्पाला गती मिळाली. कल्याण यार्डाच्या रिमॉडेलिंगमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या, मालगाड्या, उपनगरीय गाड्या यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होऊन गाड्यांचा वेग आणि संख्या वाढवणं शक्य होणार आहे. तसंच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर थेट पत्रीपूलापासून कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत जाता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading