जिल्ह्यात आज कोरोनाचे ९८४ नवे रूग्ण सापडले असून आज दिवसभरात ३१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ हजार ६०८ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ३ हजार १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९२ हजार ८१७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख ८ हजार ५३२ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ८८५ रूग्ण उपचार घेत असून २० हजार ९८९ कोरोना रूग्ण बरे झाले तर ७५८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार २६७ रूग्ण उपचार घेत असून २१ हजार ९२ बरे झाले तर ५११ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ४२८ रूग्ण असून १७ हजार ५३० बरे झाले तर ५१५ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ५८२ रूग्ण उपचार घेत असून ९ हजार ३८ कोरोनातून बरे झाले तर ३६९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३२२ रूग्ण असून ६ हजार ९२१ बरे झाले तर १९० जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १८३ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार ४७८ कोरोनातून बरे झाले तर २७५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये २९६ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ४ हजार ४९ बरे झाले तर १७५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ३४७ रूग्ण असून ३ हजार १३१ कोरोनामुक्त झाले तर ६२ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २९८ रूग्ण असून ६ हजार ५८९ बरे झाले तर २५२ जणांचा मृत्यू झाला आहे.