जिल्ह्यात आज कोरोनाचे ९८४ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ९८४ नवे रूग्ण सापडले असून आज दिवसभरात ३१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ हजार ६०८ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ३ हजार १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९२ हजार ८१७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख ८ हजार ५३२ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ८८५ रूग्ण उपचार घेत असून २० हजार ९८९ कोरोना रूग्ण बरे झाले तर ७५८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार २६७ रूग्ण उपचार घेत असून २१ हजार ९२ बरे झाले तर ५११ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ४२८ रूग्ण असून १७ हजार ५३० बरे झाले तर ५१५ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ५८२ रूग्ण उपचार घेत असून ९ हजार ३८ कोरोनातून बरे झाले तर ३६९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३२२ रूग्ण असून ६ हजार ९२१ बरे झाले तर १९० जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १८३ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार ४७८ कोरोनातून बरे झाले तर २७५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये २९६ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ४ हजार ४९ बरे झाले तर १७५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ३४७ रूग्ण असून ३ हजार १३१ कोरोनामुक्त झाले तर ६२ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २९८ रूग्ण असून ६ हजार ५८९ बरे झाले तर २५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading