टोरंट ही चोर कंपनी आहे. वाढीव बिलं देऊन ग्राहकांना ३-३ महिने तुरूंगात डांबण्याचा अमानुष प्रकार या कंपनीनं भिवंडीत केला आहे. त्यामुळं ग्राहकांना त्रास देणा-या या वीज वितरण कंपनीला कळवा-मुंब्रा भागात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. टोरंट कंपनीला कळवा-मुंब्रा भागातील वीज वितरणाचं काम देण्यात आलं आहे. सध्या ही कंपनी जागेच्या शोधात असून या कंपनीला जो जागा देईल तो आमचा दुश्मन असेल असं आव्हाड यांनी सांगितलं. भिवंडी वगळता इतरत्र वीजेच्या खाजगीकरणाचे प्रयोग अयशस्वी ठरले आहेत. टोरंट ही चोर कंपनी असल्यामुळं आम्ही या कंपनीला पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत दिला.