एकीकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी किरिट सोमैय्या यांच्याविरोधात १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला असतानाच दुसरीकडे किरिट सोमैय्या यांनीही २५० कोटी रूपयांच्या घोटाळ्याबाबत आरोप करत एक रूपयाचाही दावा दाखल करून दाखवावा असं आव्हान सरनाईक यांना दिलं आहे. टिटवाळा येथील आदिवासींची ७८ एकर जमीन हडप करण्यात आल्याची तक्रार सोमैय्या यांनी कल्याणच्या तहसिलदारांकडे केली असून याप्रकरणी सत्य समोर आणावं अशी मागणी करत किरिट सोमैय्या यांनी हे प्रति आव्हान प्रताप सरनाईक यांना दिलं आहे.