ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात तब्बल ३० हजार डझन आंब्याची विक्री झाली आहे. ठाण्यामध्ये १ ते १० मे दरम्यान आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंबा महोत्सवास ठाणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. यावर्षी आंब्याचं उत्पन्न केवळ ३५ टक्के होतं. या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूस, पायरी आणि रायवळ आंबे विक्रीस होते. याबरोबरच कोकणातील पापड, लोणची, मसाले, कोकम असे पदार्थही विक्रीस ठेवण्यात आले होते. यासाठी महिला बचत गटांना गाळे देण्यात आले होते. या महिला बचत गटांची जवळपास ५० हजारांची विक्री या आंबा महोत्सवात झाली.