हे शहर महापालिका नाही तर बांधकाम व्यवसाय चालवत असल्याचा राज ठाकरेंचा आरोप

ज्या सुविधा महापालिकेने देणे आवश्यक आहे अशा सुविधा विकासक देतात आणि पैसे कमवतात त्यामुळे हे शहर महापालिका नाही तर बांधकाम व्यवसायिक चालवतात असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे काल ठाण्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. या गप्पा दरम्यान त्यांनी हा आरोप केला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधींची गरज आहे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच सभागृहात आवाज उठवला जातो त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणं गरजेचं असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पॅनल पद्धत ही राजकीय पक्षांची सोय आहे, पॅनल पद्धतीने निवडणुका का घेतल्या जातात यापूर्वी निवडणुका होत नव्हत्या का असा प्रश्नही राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading