सध्याचे सरकार हे विवाह नोंदणी कार्यालय झालं असून वर्ण, वर्ग, व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करत आहे अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. शासनाने आंतरजातीय आणि आंतर धर्मीय विवाह करण्यापूर्वी सरकारला कळवायचं आणि मग सरकार मुलीच्या कुटुंबीयांशी चर्चा करणार असं परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकावर बोलताना त्यांनी ही टीका केली. हे परिपत्रक म्हणजे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारं आहे. आतापर्यंत राज्यात अनेक आंतरजातीय विवाह झाले आहेत, पण आंतरजातीय विवाह करणारे असाल तर सरकारला कळवावे लागेल, ही कोणती पद्धत आहे असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. हा प्रकार म्हणजे सरकारला वेड लागलं असल्याची टीका आव्हाड यांनी यावेळी बोलताना केली.