संताचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जोडण्याचा हा कार्यक्रम आहे – जितेंद्र आव्हाड

संताचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जोडण्याचा हा कार्यक्रम आहे अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील घटनेविषयी बोलताना त्यांनी ही टीका केली.
आयोजन कर्त्यांची नावे तपासा. ही  राजिनामा देणारी माणसं नाही, नागपूर ला ‘हलबा’ जातीचा मोर्चा निघाला , तेव्हा पोलीसांच्या लाठीचार्ज मध्ये काही लोक मरण पावले. तेव्हा शरद पवार यांचा पंधरा मिनीटात राजिनामा घेतला. संवेदना जिवंत असल्या पाहिजेत. संवेदने विषयी आपल्याला काही बोलायचे नाही. संताचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जोडण्याचा हा कार्यक्रम आहे. आयोजन कर्त्यांना कसे कळले नाही की ४० अंशाच्या वरती उष्णता असूनही हा कार्यक्रम कसा आयोजित केला. धर्माधिकारी हे माणुसकीचा झरा आहेत. त्यांच्या शिकवणीतुन काहीच शिकला नसाल तर दुर्देव आहे. एवढ्या गर्दीमध्ये एक मेला काय आणि शंभर मेले काय, मृत्यू हा मृत्यू आहे. कार्यक्रम करतांना थोडी बुद्धी वापरायला हवी होती. तुमच्या राजकीय महत्त्वकांक्षेमुळे किती लोकांचे जीव गेले. तुम्ही या गर्दीचा फायदा राजकीय गणितासाठी घेत होता हे मान्य केले पाहिजे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading