रहिवाशांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी असून क्लस्टर प्रकल्प राबवताना अन्याय होऊ देणार नाही – संजय केळकर

क्लस्टर डेव्हलपमेंटचा क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्याची अंमलबजावणी जर नीट केली नाही तर क्लस्टरचे एस.आर.ए. होईल, ते होऊ देऊ नका असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी राबोडी येथील “जन की बात” या कार्यक्रमात केले.

भाजपा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राबोडी येथील रहीवाशांनी क्लस्टर संबंधी अनेक प्रश्न, समस्या, शंका उपस्थित केल्या. त्यावेळी केळकर यांनी रहिवाशांच्या पाठीशी ठाणे भाजपा खंबीरपणे उभे असून क्लस्टर प्रकल्प राबवताना अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले. या कार्यक्रमात नागरीकांनी पाणी विषय, पार्कींग, अनधिकृत बांधकाम, नाले – गटारे, अतिक्रमणित फुटपाथ, शैक्षणिक अशा विविध विषयांवर आपल्या समस्या मांडल्या तर राबोडीतील गाजलेल्या जमिल शेखच्या हत्येसंदर्भात त्यांचे कुटुंबियांनी उपस्थित राहून न्याय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले.काही दिवसांपूर्वी “जन की बात” हा कार्यक्रम ठाणे कोपरी पूर्व या ठिकाणीही घेण्यात आला होता. त्यालाही नागरीकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला होता. ठाणे भाजपा तर्फे “जन की बात” हा कार्यक्रम विविध मंडलात घेण्यात येणार आहे असे संजय केळकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading