या सरकारला कायमची सत्ता दिलेली नाही. आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केला. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मालवणी महोत्सवात बोलताना नारायण राणे यांनी हा विश्वास व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष कधी कोणाकडे गेला नव्हता. शिवसेना स्वत: आली होती. भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता असून राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही. ५४ पैकी त्यांच्याकडचे ३५ आमदार नाराज आहेत असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला. या सरकारनं २ लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. परंतु अध्यादेशात कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या तारखेचा उल्लेख नाही असा टोलाही राणे यांनी लगावला. या सरकारला सिरियस बेस नाही, या सरकारला राज्याचे प्रशासन माहित नाही, विकास माहित नाही अशा माणसाच्या हातात सत्ता गेल्यानं त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? असं नारायण राणे यांनी सांगितलं.