ठेकेदार रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा करत आहेत – अविनाश जाधव

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुख्यमंत्र्यांचे ठाणे या धर्तीवर रस्त्यांसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत, याच निधीतून बनवलेला एक रस्ता तो ही ठाणे महापालिका मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शहरात होत असलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकतीच आयआयटीची एक टीम रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासून गेली होती. त्याचा फायदा नक्की होणार का ? की नुसताच दिखावा होत आहे. असा सवाल विचारण्यात येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या नादात ठेकेदार रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading