धरणातील पाणीसाठ्यात घट – पाऊस आणखी लांबल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

पाऊस यंदा लांबल्यानं धरणातील पाण्याच्या साठ्यात कमालीची घट झाली असून पाऊस आणखी लांबल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात २४५ दशलक्ष घनमीटर म्हणजे अवघा २६ टक्के पाण्याचा साठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी भातसा धरणात ३२ टक्के पाण्याचा साठा होता. तीच परिस्थिती बारवी धरणाची असून बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३३ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात ४४ दशलक्ष घनमीटर म्हणजे १९ टक्के पाण्याचा साठा आहे. गेल्यावर्षी याच काळात हा पाण्याचा साठा ३२ टक्के होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात बरीच घट झाल्याचं दिसत असून पाऊस आणखी लांबल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading