पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सात वर्षे लोटली तरी देखील पालघर जिल्हयातील आदिवासी गरीब गरजू लोकांना जिल्हा रुग्णालय नाही. या संदर्भात आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. सात वर्षे उलटून गेली तरी जिल्हा रुग्णालयाच्या कामाचा नारळ फुटला नाही. चार महिन्यापूर्वी पूर्वी टेंडर झाले मात्र काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही. जिल्ह्यात आरोग्य सुविधा नसल्याने आदिवासी बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत. आघाडी सरकरने पालघर जिल्ह्यातील नागरिकांना वा-यावर सोडले आहे अशी खंत केळकर यांनी व्यक्त केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोरच केळकर यांनी पालघर जिल्यातील आरोग्य विषयी समस्याचा पाढा वाचला. जोपर्यंत जिल्हा रुग्णालय होत नाही तोपर्यंत मनोर येथील 200 खाटांचे उप जिल्ह्य रुग्णालयाचे आणि 20 खाटांचे क्रोमा सेंटरचे काम अधिक गतीने सुरू करण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले. तथापि जो पर्यंत पालघर जिल्हा रुग्णालय होत नाही, तो पर्यंत उच्च आसनावर खुर्चीवर बसणार नाही, असा पण सामाजिक कार्यकर्ते संतोष जनाठे यांनी केल्याचे केळकर यांनी आरोग्य मंत्र्यांचा निदर्शनास आणून दिले. त्याबाबत राजेश टोपे यांनी संतोष जनाठे यांना आश्वासित करून त्यांचे समाधान केले. या सर्व बाबींची दखल घेऊन रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधा तातडीने पुरविण्याच्या सूचना संबधित अधिकार्यांना दिल्या जातील असेही आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच परिसरातील खासगी रुग्णालये महात्मा फुले योजना राबविण्यास सक्षम असतील. अशा रुग्णालयामध्ये ही योजना सुरु करण्यासाठी तात्काळ मान्यता देण्यात येईल अशी घोषणा राजेश टोपे यांनी केली.