आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक वैभव कदम यांच्या आत्महत्येमुळे गुढ

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक वैभव कदम यांच्या आत्महत्येमुळे गुढ निर्माण झाल आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणाच्या वेळी आव्हाड यांचा वैभव कदम अंगरक्षक होता. काल कदम यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली होती. ठाण्यातील शासकिय रुग्णालयात त्यांच शवविच्छेदन करण्यात आलं. प्रार्थमिक अहवालात ट्रेन खाली आल्यानेच मृत्यू झाल्याची जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. शवविच्छेदना नंतर त्यांचे पार्थिव पुन्हा त्यांच्या राहत्या घरी तळोजा येथे नेण्यात आले. वैभव कदम यांना ठाणे लोहमार्ग पोलीस जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन आले होते. ठाणे लोहमार्ग आणि ठाणे शहर पोलीस यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading