2019 मधील दुर्घटनेनंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल आजपासून सुरु झाला आहे.
14 मार्च 2019 ला रोजी हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला होता. तर या दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने हा पूल पाडून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. या पुलाचा दररोज सुमारे 50 हजार पादचाऱ्यांना लाभ होणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी सात कोटी रुपये खर्च आला असून पुलाची लांबी 33 मीटर आणि रुंदी 4.4 मीटर आहे.