आनंद परांजपे यांना संसदेत काम करताना पाहिलं आहे. ते उच्चशिक्षित तर आहेतच पण सुसंस्कारीतही आहेत. शिक्षणातूनच प्रगल्भता आणि समानता आणता येते त्यामुळं या दोन्ही गुणांचा मेळ साधला जात असेल तर हा बोनस आनंद परांजपे यांच्या रूपाने ठाणेकरांना मिळणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठी आयोजित महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. समस्त ब्राह्मण समाजानं सुसंस्कृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे यावर त्या बोलत होत्या. आदर्श खासदार कसा असावा हे संसदेत पाहताना उमगलं आहे. संसदेमध्ये सुशिक्षित खासदार असावेत यासाठी ठाणेकरांनी आनंद परांजपे यांना संधी दिली पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. राज्यात आणि देशात परिस्थिती बदलली आहे. देशात परिवर्तनाची गरज आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.