ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असतानाही, शिवसेनेचे माजी महापौर आणि माजी नगरसेवकांसह स्मार्ट सिटीतील विकासकामांचा दौरा करणारे आयुक्त विपिन शर्मा हे शिवबंधनात अडकले आहेत का, असा बोचरा सवाल भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांनी विचारला आहे.
sujay patki
सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दिडशे कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड
ठाणे महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील नवनवीन घोटाळ्यांची केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चौकशी सुरु केली असतानाच या प्रकल्पांचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दिडशे कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांनी केला आहे.