जिल्ह्यात अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील १२वी पर्यंतच्या शाळांना १४ आणि १५ जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
schools
महापौरांनी केली शाळांची पाहणी – अधिका-यांची केली कान उघडणी
आठवी ते दहावीचे वर्ग सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पल्लवी कदम यांनी खोपट येथील शाळेची पाहणी केली. यावेळी पाण्याच्या टाक्यांची अंतर्गत साफसफाई अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली होती, परंतु आजूबाजूच्या परिसरात साफसफाई न केल्याचे निदर्शनास येताच महापौरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून संपूर्ण परिसर तातडीने साफ करण्याचे निर्देश नगर अभियत्यांना दिले.
सोमवार पासून पुन्हा वाजणार शाळेची घंटा
शहरातील सर्व माध्यमांचे इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू होणार असून या दृष्टीने सर्व शाळांची साफसफाई आणि इतर अनुषंगिक पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने सर्व शाळांना दिले असून त्यानुसार योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापौर आणि महापालिका आयुक्तांनी सर्व शाळा व्यवस्थापनांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
ठाण्यातील शाळा १५ जानेवारी पर्यंत सुरू न करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचं हे वर्ष जवळपास वाया गेलं असून जिल्ह्यातील शाळाही १५ जानेवारी पर्यंत सुरू करता येणार नाहीत असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.