कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचं हे वर्ष जवळपास वाया गेलं असून जिल्ह्यातील शाळाही १५ जानेवारी पर्यंत सुरू करता येणार नाहीत असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संपूर्णत: लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळं शाळेचं नवीन वर्ष सुरूच होऊ शकलं नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू जनजीवन पूर्ववत झालं. मात्र पुन्हा दिवाळीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही गोष्टींवर बंदी आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं पुन्हा लॉकडाऊन लागू होतं का अशी साशंकता व्यक्त होत होती. मात्र त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यातच इंग्लंडमधील कोरोनाच्या विषाणूच्या नवीन प्रादुर्भावामुळं पुन्हा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा सुरू होतील असं वाटत असतानाच आता १५ जानेवारीपर्यंत तरी शाळा सुरू करता येणार नाहीत असं जिल्हाधिका-यांनी म्हटलं आहे. त्यामुळं बहुधा विद्यार्थ्यांचं हे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता दिसत आहे.