३० नोव्हेंबर आणि १४ डिसेंबरला होणारी ग्रहणं भारतातून दिसणार नाहीत – दा. कृ. सोमण

येत्या सोमवारी म्हणजे ३० नोव्हेंबरला छायाकल्प चंद्रग्रहण आणि १४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. येत्या सोमवारी दुपारी १ ते सायंकाळी ५-२६ यावेळेत चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. परंतू हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण उत्तर पूर्व यूरोप, अमेरिका, ओसेनिया, ॲास्ट्रेलिया आणि आशियाच्या काही भागातून दिसणार आहे. तसेच सोमवार, १४ डिसेंबर रोजी या वर्षातील अखेरचे खग्रास सूर्यग्रहण रात्री ७-०३ ते १२-२३ यावेळेत होणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहणही भारतातून दिसणार नसल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले. हे सूर्यग्रहण पॅसिफिक महासागर, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, अंटार्क्टिका आणि आफ्रिकेचा दक्षिण पश्चिम भाग येथून दिसेल. ही ग्रहणे चीनला वाईट असून भारताला चांगली असल्याचे भाकित काही लोकांनी केले आहे, त्यात काहीही तथ्य नाही. चंद्र-सूर्यग्रहणे ही खगोलीय नैसर्गिक घटना असते. त्यांचा मानवी जीवनावर आणि देशांवर काहीही परिणाम होत नसतो असंही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading