२६/११च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना ठाण्यात मानवंदना देण्यात आली. खासदार राजन विचारे यांच्यातर्फे दरवर्षी ही मानवंदना दिली जाते. या निमित्तानं शहीद उद्यान येथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मशाल प्रज्वलित करून मान्यवरांच्या हस्ते या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी युवकांच्या एका गटानं देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून शहीदांना मानवंदना दिली.