एक आठवड्यात जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर सर्व लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. हिरानंदानीमध्ये अपुरा पाणी पुरवठा असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळं आमदार संजय केळकर यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांसह पाहणी केली. हिरानंदानी मधील इमारतींना कमी पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. पाणी मॉलला पुरवलं जात असल्यामुळं पाणी कमी येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. आमदार संजय केळकर यांनी अधिका-यांशी त्यावर चर्चा केली आणि एका आठवड्यात पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार केळकर यांनी यावेळी दिला.