हरवलेले आणि चोरीला गेलेले ७०० मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत

ठाणे परिमंडळ १ मधील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींमधील हरवलेले आणि चोरीला गेलेले ७०० मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत करण्यात आले. ठाणे परिमंडळ १ मध्ये मोबाईल हरवल्याच्या आणि चोरण्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यानुसार पोलीसांनी एक पथक तयार करून मोबाईलचा शोध घेण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे वैयक्तीक माहिती घेऊन मोबाईल निगराणीखाली ठेवून १ कोटी २८ लाखांचे विविध कंपनीचे एकूण ७११ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये अॅपल कंपनीचे २५ मोबाईल, वन प्लस ३५, व्हीवोचे १५२, ओप्पो आणि एमआय प्रत्येकी १३६ तर सॅमसंग कंपनीचे १०७ मोबाईल फोन होते. मोबाईल मूळ मालकांना परत मिळाल्यामुळे त्यांच्या चेह-यावर समाधान झळकत होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading