सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाण्यातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी हे बॅनर लावले आहेत. ठाण्यातील तीन हात नका व जांभळी नाका परिसरात हे बॅनर लावण्यात आले असून या बॅनरवर मोठ्या विचारांचा मोठा विजय असे लिहिण्यात आले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो या बॅनरवर आहेत.