स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने मशाल रॅली

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅली काढण्यात आली. दरम्यान,  यावेळी “गांधी-नेहरूंच्या स्वप्नातील भारत  घडविण्यासाठी नवा लढा उभारण्याची गरज आहे. अन् आम्ही असा भारत घडवू, असा विश्वास  जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ” मशाल रॅली”  काढण्यात आली.

स्वातंत्र्य चळवळीत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी जीवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. लाठ्या-काठ्या, तुरुंगवास आणि प्रसंगी गोळ्याही झेलल्या. हुतात्म्यांच्या या समर्पणातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे  या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ते राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान, तलावपाळी, ठाणे दरम्यान  “मशाल रॅली” काढण्यात आली. या रॅलीमध्ये सुमारे पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाचपाखाडी, आग्रा रोड, राममारूती रोड, साईकृपा हाॅटेल, तलावपाळी असा प्रवास करीत ही रॅली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून जय हिंद,  वंदेमातरम,  भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या.
या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हजारो-लाखो लोकांच्या बलिदानातून आपणाला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करायचा असेल तर आपणाला जातीपातील मतभेद दूर करावे लागतील . तरूणांना अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी आपणाला लढा उभारावा लागेल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading