स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंग्याला सलामी दिली.
अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मंगलमय वातावरणात जिल्हा परिषदेत ध्वजारोहण सोहळा पार पडला.
ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर ठाण्यातील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तर जिल्हा परिषदेच्याच बी. जे. हायस्कूल कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. या वेळी तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त राहण्यासाठी शपथ घेण्यात आली. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बढती मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर ठाण्यातील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तर जिल्हा परिषदेच्याच बी. जे. हायस्कूल कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. या वेळी तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त राहण्यासाठी शपथ घेण्यात आली. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बढती मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.