भाजपा, अर्पण फाऊंडेशन यांच्यावतीने भारतमातेची महाआरती, सामुहिक राष्ट्रगान, सायकल रॅली, ज्येष्ठ व माजी सैनिकांच्या रॅलीसह स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे व अर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रह्मांड, कोलशेत परिसरात `हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. त्याचबरोबर विविध कार्यक्रम करण्यात आले. त्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. पारंपरिक नऊ वारी साडीमध्ये ७५ महिलांकडून भारतमातेची आरती, सायकल रॅली, ज्येष्ठ नागरिक व निवृत्त सैनिकांची रॅली काढण्यात आली. तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.