स्वराज संस्थेतर्फे लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हद्दीला लागूनच असलेल्या लोकमान्य नगर,शास्त्री नगर ,परेरा नगर, इंदिरा नगर, वागळे इस्टेट परीसरात गेल्या काही महिनांपासून माकडांनी धुमाकूळ घातला असून त्यांचा उपद्रव वाढला आहे.घराघरात शिरून खाण्याचे पदार्थ काढून खाणे, घरातील झाडांच्या कुंड्या वायरिंग तोडणे, परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस करणे. आता डोंगरा जवळ च्या परिसरात असलेला माकडांचा वावर संपूर्ण ठाणे शहरात व्हायला वेळ लागणार नाही. याची वन विभागाने गंभीर नोंद घेणं आवश्यक आहे.अन्यथा माकडांना अवरणे कठीण होऊ शकते. या सर्व प्रकारामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. कोणतीही अप्रिय घटना अथवा दुर्घटना होऊ नये यासाठी स्वराज्य संस्थेतर्फे वन अधिकाऱ्यांना या समस्येबाबत पत्र देण्यात आले असून वन अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे येत्या शनिवार पासून वन विभाग अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्था या संदर्भात एक मोहीम हाती घेणार असून प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांना समुदेशन करणार आहेत तसेच उपद्रवी माकडं पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.