स्मार्ट सिटी संकल्पनेच्या माध्यमातून शाश्वत विकास प्रक्रियेच्या विविध योजनांमध्ये सहभागी होणा-या नागरी युवकांना ठाणे स्मार्ट सिटी उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. शहरात सुरू केलेल्या सर्व पथदर्शी प्रकल्पांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून स्मार्ट सिटी फेलोशिपचे प्रतिनिधी अंबर सिन्हा आणि जोश सिंग यांच्या वतीनं विशेष योजना तयार करण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वीज बचत, आरोग्य अशा महत्वाच्या प्रकल्पांमध्ये नागरिक आणि युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी डीजी ठाणेच्या माध्यमातून काही प्रोत्साहनपर योजना राबवण्यात आल्या आहेत. यामध्ये सायकलिंग करून इंधन बचत करणारे युवक, तलावाचे संवर्धन, प्लास्टीकचा पुनर्वापर करणारे सामाजिक कार्यकर्ते, रक्तदान करणारे युवक, घरगुती वीज बचत करणारे नागरिक, पाणी बचत करणा-या सोसायट्या या सर्वांनी शाश्वत विकासामध्ये योगदान दिलं असून या सर्वांचा समीर उन्हाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.