ठाण्यासारख्या महानगरांमध्ये स्थलांतरीत कुटुंब आश्रयाला येतात. शहरातील अशा कुटुंबीयांच्या मुलांच्या मुलभुत शिक्षणासाठी पालिका प्रयत्नशील राहिलच. त्याचबरोबर सिग्नल शाळेसारखा प्रयोग जो देशाच्या पातळीवर आदर्श प्रयोग म्हणून नावाजला गेलाय त्या प्रयोगाच्या मागेदेखील ठाणे महापालिका भक्कमपणे उभी राहिल असा विश्वास व्यक्त करत महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सिग्नल शाळेतुन शिक्षण झालेल्या दशरथ पवार याचा बारावी पास झाल्याच्या निमित्ताने सत्कार केला आणि त्याला भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सिग्नल शाळेसारखा प्रयोग ठाणे महापालिकेच्या हद्दीत उभा राहिला याचा ठाणे महानगरपालिका व प्रत्येक ठाणेकराला अभिमान आहे. पुलाखालील मुले ही आपल्याच राज्याची नागरिक आहेत त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून योगदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे या शाळेत शिकत असलेल्या सर्व पन्नास मुलांच्या आणि पर्यायाने सिग्नल शाळेच्या मागे पालिका भक्कमपणे उभी राहील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
समर्थ भारत व्यासपीठ सारख्या सामाजिक संस्थाच्या सहभागाने ठाणे महानगरपालिका शाळाबाह्य मुलांसाठी करीत असलेले काम वाखाणण्यासारखे असून महापालिकेसाठीही सिग्नल शाळा हा उपक्रम अभिमानाचा आहे. यावेळी आयुक्तांनी सिग्नल शाळेच्या पाच वर्षांच्या प्रवासाची माहिती समजुन घेतली