सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना उपनगरीय सेवेचा फायदा मिळावा यासाठी सध्याच्या वेळेत बदल करावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सध्याच्या वेळा गैरसोयीच्या असल्यामुळं प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. प्रवाशांना अनेकदा काम संपल्यानंतर रेल्वे स्थानकात ताटकळत रहावं लागतं. सध्याच्या रात्री ९ ते सकाळी ७ या वेळेत बदल करून रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तसंच दुपारी १२ ते ४ या वेळेत बदल करून रात्री ९ वाजेपर्यंत प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.