संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेसचा विरोध नसून ते आमचे आराध्य दैवत आणि श्रध्दास्थान आहे. मात्र या विषयाला फाटे फोडून कलुषित वातावरण निर्मिती होऊ नये असं मत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल व्यक्त केले. बाळासाहेब थोरात यांनी काल ठाण्याला भेट दिली त्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यालयालाही भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष असून प्रत्येकाला पक्ष वाढवण्याची संधी आहे. भारतीय जनता पक्षाची जातीयवादी विचारसरणी आणि हुकुमशाही कार्यपध्दती मान्य नसल्यानं आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळं सरकारमध्ये प्रत्येकवेळी योग्य पध्दतीने चर्चा करून निर्णय घेऊ असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.