विरोधकांना दाबण्याचा आणि भीती दाखवण्याचा प्रयत्न केंद्रातल्या मोदी सरकारचा आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईतील ईडीच्या छापेमारीवर बोलताना त्यांनी ही टीका केली. ही मोदी सरकारची शेवटची कारवाई आहे. विरोधकांना दाबण्याचा आणि भीती दाखवण्याचा केंद्रातल्या मोदी सरकारचा प्रयत्न आहे. ईडी आणि सीबीआयला कोणी घाबरण्याचं कारण नाही, सुप्रीम कोर्टाने ईडी आणि सीबीआयवर ताशेरे ओढले आहेत. चौकशी होऊ द्या त्यात काही निष्पन्न होणार नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.