लसीकरण झालेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. याचा सर्वाधिक फटका कामगार, कष्टकरी, नोकरदार आणि हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास नाकारण्यात आल्यामुळं अनेकांच्या रोजगारावरही गदा आली आहे. काही ठराविक लोकांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी असल्यामुळं इतर लोकांवर अन्याय होत आहे. रेल्वे प्रवासास मनाई असल्यामुळं रस्त्यावरचा भार वाढला आहे. हातावर पोट असणा-या लोकांना प्रवासाचा अन्य मार्ग नसल्यामुळे या प्रवाशांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि लसीकरण झालेल्यांना प्रत्यक्ष पुरावे पाहून रेल्वे प्रवासाला परवानगी द्यावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.