राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये संकल्प सत्याग्रह करण्यात आला. गांधी उद्यानात करण्यात आलेल्या या सत्याग्रहाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही सहभागी झाले होते. मोदी सरकारचा निषेध म्हणून हा सत्याग्रह करण्यात आला. यावेळी मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी सत्याग्रहींनी विविध फलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला. ना डरे थे ना डरेंगे, हम लढे थे हम लढेंगे, सत्य मेव जयते, अशा आशयाचे फलक होते.