ठाण्यामध्ये जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असुनही त्याकडे गांर्भियानं पाहिल जात नसल्यामुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत. गंल्या दोन आठवड्यात जलवाहिनी फुटण्याचे चार वेळा प्रकार घडले आहेत. विकास कामांसाठी खोदताना असे प्रकार घडले आहेत यातुन लाखो लीटर पाणी वाया गेल आहे. ठाणेकर पाण्यासाठी त्रासले असतानाच दूसरीकडे पाणी वाया जात आहे. काल रात्रीही सॅटीसच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना मोठी जलवाहिनी फुटली. त्यातुन नेहमीप्रमाणे लाखो लीटर पाणी वाहून गेले. वारंवार असे प्रकार घडल्यानंतरही कोणावर कारवाई झाल्याचे ऐकु आले नाही. यामुळे पालिका प्रशासन याकडे गांर्भियाने बघते की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.