राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी तूर्तास अटक करणार नाही, याबाबत राज्य सरकारने न्यायालयात १८ जानेवारी पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. पोलीसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घ्यायला हवी, यात सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातोय असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. अश्या पोलीस अधिका-यांना आर्थिक दंड लावून ती रक्कम त्यांच्या पगारातून वगळायला हवी, पोलिसांनी कायदयाचे उल्लंघन करू नये असं कोर्टाने म्हटलं आहे.