रस्त्यावरील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी उद्या रस्ता सुरक्षा जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही रस्ता सुरक्षा रॅली ठाणे महापालिका ते नवी मुंबई महापालिका अशी असून महापौरांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ होणार आहे. रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून तसंच निष्काळजीपणामुळे होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्याबाबतचा संदेश या सुरक्षा जागृती रॅलीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ठाणे ते नवी मुंबई दरम्यान २५ ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर या रॅलीत ५०० हून अधिक दुचाकी स्वार सहभागी होणार आहेत. या रॅलीतून मुलभूत सुरक्षा आणि रस्त्यावरील अपघात रोखणे याविषयी जनजागृती केली जाणार आहे.