रविंद्र आंग्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक

ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराच्या विरोधात बंदी हुकूम मोडून मोर्चा काढल्याबद्दल रविंद्र आंग्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाला आधी देण्यात आलेली परवानगी नाकारण्यात आली. हा मुलभूत हक्काचा भंग असल्याची प्रतिक्रिया रविंद्र आंग्रे यांनी व्यक्त केली. ठाणे महापालिकेतील विविध प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी रविंद्र आंग्रे यांच्यातर्फे मोर्चा काढला जाणार होता. पण पोलीसांनी हा मोर्चा महापालिकेजवळच अडवला. त्यामुळं मोर्चातील ५ जणांनी पोलीस बंदोबस्तात जाऊन जिल्हाधिका-यांना लाचलुचपत विभाग आणि सीआयडी चौकशीचं मागणी करणारं एक निवेदन दिलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading