म न से च्या वाटेला गेल्यानचं मुख्यमंत्री पद गेल्याचा राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला

हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षांच्या कृतीत हिेदूत्व दिसत नाही. महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं अनेक आंदोलनं केली. अशांच्या वाटेला गेल्यानंच मुख्यमंत्री पद गेल्याचा टोला राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मारला. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा १७ वा वर्धापण दिन काल ठाण्यात साजरा झाला त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळी स्थापनेपासून पक्षाने केलेल्या आंदोलनाचा लेखजोखा असलेल्या डिजीटल पुस्तकाचे तसेच पक्षाच्या संकेत स्थळाचे प्रकाशन करण्यात आलं. काही ठरावीक पत्रकार अपप्रचार करतात. अशी टीकाही ठाकरे यांनी या वेळी केली. भरती ओहोटी ही नैसर्गीक असून ती कोणालाचं टळलेली नाही. भारतीय जनता पक्षात आज जरी भर्ती असली तरी उद्या ओहोटी येऊ शकते असा ईशारा त्यांनी दिला. संदिप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला कोणी केला हे त्याला प्रथम कळेल आणि त्यानेचं हे केल्याचे इतरांना नंतर कळेल असा ईशाराही त्यांनी या वेळी दिला. पक्षाकडे सत्ता नसतानाही कार्यकत्यांनी आपली उर्जा राखल्या बदृल राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याचे आभर मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading