मोदी सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं विविध सामाजिक पक्ष आणि संघटनांचं आवाहन

लोकशाहीची हत्या करणा-या मोदी सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार आनंद परांजपे यांना विजयी करा असं आवाहन ठाण्यातील सामाजिक आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एका पत्रकार परिषदेत केलं आहे. मोदी सरकारच्या काळात लोकशाहीची हत्या झाली आहे. अभव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन झाले आहे. लोकशाही असेल तर किमान भूमिका मांडता येते, आंदोलनं करता येतात, पण मोदी सरकारची पावलं हुकुमशाहीच्या दिशेनं पडत असल्यानं लोकशाहीच्या संरक्षणासाठी भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीचा पराभव करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा झाली असून या सकारात्मक चर्चेनंतर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणं जनतेसाठी भयावह परिस्थिती निर्माण करणारं असल्याचं एकमत झाल्यानं विविध संघटनांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाअसून उद्या सत्तेवर आल्यास या मंडळींनी न ऐकल्यास आमचा लढा हा असाच चालू राहणार असल्याचं संजय मं.गो. यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेस बँक कर्मचा-यांचे नेते विश्वास उटगी, एम. ए. पाटील, जगदिश खैरालिया, शिरिष मेढी, वंदना शिंदे, मतीन शेख हे उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading